दैनदिन व्यवहाराचे नोंदी टॅली सॉफ्टवेअर मध्ये संगणीकृत करुन आर्थिक पत्रके तयार करणे तसेच बँक संबंधीत सर्व व्यवहाराचे कामकाज करणे. एका आर्थिक वर्षात तीन अर्थसंकल्प पणन मंडळाकडे सादर करणे. शासनाला देय असलेले सर्व कर तसेच विविध देय भरणा करणे. लेखा विभागा संबंधित सर्व काम-काज करणे. बाजार समितीचे आस्थापनेवरील सर्व कर्मचारी, रोजंदारी कामगार यांचे आस्थापना संबंधीत सर्व आदेश काढणे रजा खतावनी नोंदविने त्यांचे कामकाजाचे नियोजन करणे त्या संबंधीत सुचना पत्र देणे इत्यादी.
दैनंदिन धान्य खरेदी विक्री चे व्यवहार चेक करून आलेल्या बिलांची नोंद घेणे, सेव वसुली करणे, लिलाव करणे. दैनंदिन बाजार भाव काढुन महाराष्ट्र राज्य कृषि, पणन मंडळाच्या संकेतस्थळावर अपलोड करणे, वार्षिक बाजार भाव भरणे. धान्य विभागात शेतक-यांन मार्फत येणा-या शेतमालाचे विक्री ही खुल्या लिलाव पध्दतीने करण्यात येते. सदर लिलाव हा परवानाधारक खरेदीदार, अडते व शेतकरी यांचा समोर होते. परवानाधारक मापा-यां कडुन शेतमालाचे अचुक मोजमाप करण्यात येते. बाजार समितीने नेमलेल्या कर्मचा-यां मार्फत सदर लिलावाची सौदा पट्टया देण्यात येते. शेतक-यांना त्याचे शेतमालाची रक्कम अडत्यां कडून मिळते.
बाजार समिती मध्ये खालील प्रमाणे परवानाधारक आहेत.
अ.क्र. | अनुज्ञप्ति प्रकार | एकुन अनुज्ञप्ति |
---|---|---|
1 | अडते | 20 |
2 | खरेदीदार | 59 |
3 | हमाल | 19 |
4 | मापारी | 4 |
परवानाधारक अडते व खरेदीदार मार्केट यार्डवर खरेदी – विक्रीच्या नोंदणी धान्य डिमांड विभागात होते, व मार्केट फी व सुपरव्हिजन फी ची आकारणी या विभागांतर्गत होते. दैनंदिन अडत / खरेदी बिलांची माहवार तपासणी केली जाते
शेतक-यांना त्यांचे शेतमाल तारणावर तारण कर्ज देण्यात येते. हंगामाच्या काळात बाजार मध्ये शेतमालाची आवक वाढलेली असते बरेचवेळा आवक जास्त असल्याने भाव कमी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या काळात शेतक-यांना शेतमाल कर्ज भावाने कावा लागुनये व त्यांची पैशाची गरज भगविण्यासाठी या करात महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंळाचे निर्देशनाने बाजार समिती स्व:फंडातुन शेतमाल तारण योजना राबविण्यात येते. या विभागात शेतक-यांने शेतमालवार आवश्यक त्या कागद पत्राची पूर्तता करुण तारण कर्ज देण्यात येते.
बाजार समितीचे कार्यक्षेत्रात कापसाचे उत्पन्न मोठ्या प्रमाणात होते. परवानाधारक व्यापार्याकडून कापूस खरेदी केल्या जातो. त्याकडुन मार्केट फी व सुपरव्हिजन फी ची आकारणी करुण वसुल केली जाते. शेतकर्याचे कापसाचे योग्य वजनमाप करून त्याचे पेमेंट मिळेपर्यंत सर्वं बाबीकडे लक्ष दिल्या जाते.
दैनंदिन कार्यालयीन पत्रव्यवहाराचे आवक व जावक नोंद घेण्यात येते.